मे 15, 2015
तुम्ही वेळेवर कर भरता का? तुम्ही वाहतुकीचे नियम पाळता का? तुम्ही दुकानांत वस्तूंच्या पावत्या मागता का? तसं असेल तर तुम्ही गाढव आहात . . . दचकू नका. आपल्या देशात, जिथे जास्तीत जास्त कायदा मोडणाऱ्याला हुशार किंवा चतुर समजलं जातं, तिथे दुसरं काय म्हणणार? आयुष्यभर झुरतोय घ्यायला घर मोठं त्याने मात्र खोली बांधली जिथे अंगण होतं तरीही घरपट्टीला उशीर झाला तर मीच घाबरतो कारण, कायदा पाळणाराच शेवटी गाढव ठरतो लहानपणापासून ऐकत आलो आहे बात कायद्याचा म्हणे भारी लांब असतो हात पण हा हात कायदा मोडणाऱ्यांना कधी धरतो? कारण, कायदा पाळणाराच शेवटी गाढव ठरतो
मे 6, 2015
दोन दिवसांपूर्वी अमेरिकेतील एका बावीस वर्षीय भारतीय तरुणाला कामाच्या अतिरेकी ताणामुळे आपले प्राण गमवावे लागले. भविष्यात सुखाचा उपभोग घेता यावा म्हणून दिवसरात्र एक करून काम करायचं आणि ते करताना आसपासच्या लहान लहान आनंददायी सुखांकडे दुर्लक्ष करायचं ही पद्धत आपल्याकडेही सर्वमान्य झाली आहे. पण एखाद दिवशी अशी घटना घडते की कामाच्या धुंदीत असलेल्या आपले डोळे खाडकन उघडतात ... नवरा तिचा महत्वाकांक्षी तिच्याच इतका भारी एका म्यानामध्ये कशा मग राहतील दो तलवारी प्रेमविवाहच असे परंतु नावापुरता फक्त तीन वर्षं झाली असतील अन् झाले ते विभक्त तेव्हापासून चिंटूला मग फक्त तिचा आधार चिंटूही पण फारच होता मुलगा समजूतदार
मे 1, 2015
हल्ली आपल्यातील बहुतेकांचा दिवस जातो संध्याकाळ होण्याची वाट बघण्यात, आठवडा जातो शनिवारची वाट बघण्यात, वर्ष जातं त्या एका पंधरा दिवसांच्या सुट्टीची वाट बघण्यात. मात्र ती संध्याकाळ, ते शनिवार, रविवार, ती सुट्टी जेव्हा येते तेव्हा तरी आपल्याला मोकळा वेळ मिळतो का? तुम्हाला हल्ली मोकळा वेळ मिळतो का? मोकळा म्हणजे खरोखर मोकळा लहानपणी मुंग्यांची रांग बघण्याकरता मिळायचा . . . तसा शाळेत उन्हाळ्याच्या सुट्टीत वाळत घातलेल्या पापडांची राखण करताना मिळायचा . . . तसा कॉलेजच्या दिवसांत स्टेशनवरून घरी रमत गमत पायी येताना मिळायचा . . . तसा
एप्रिल 17, 2015
शाळेत असताना वार्षिक परीक्षा नावाचं दिव्य पार पाडण्याकरता परीक्षेनंतर येणारी उन्हाळ्याची सुट्टी हे कारण पुरेसं असायचं. पिढ्यांमागून पिढ्या बदलल्या पण हा सुट्टीचा आनंद काही बदललेला नाही. अशीच एक सुट्टी उपभोगणाऱ्या बच्चा कंपनीकरता ही एक कविता, आपल्या सभोवतालच्या बाळगोपाळांना अवश्य वाचून दाखवा . . . डोंगरावरती स्वच्छ होता पाण्याचा एक झरा ससे म्हणाले हाच आहे पिकनिक स्पॉट बरा खेळून डुंबून दमल्यावरती लागे त्यांना भूक खीर होती आणली म्हणती मारू ताव जरा चमचेच नव्हते आणले त्यांनी खाणार खीर कसे डोंगरावरती पिकनिककरता गेले चार ससे
एप्रिल 3, 2015
तराजूच्या एका पारड्यात भ्रष्टाचार, प्रदूषण, गुन्हेगारी, स्पर्धा, चिंता, आजारपणं वगैरे आयुष्य असह्य करणाऱ्या गोष्टी टाकल्या तरी हा तराजू संतुलित करणाऱ्या अनेक गोष्टी आपल्या दिमतीला हजर असतात. ह्या गोष्टी आपल्याला देऊन आपल्यावर अनंत उपकार करणाऱ्या कलाकार, क्रीडापटू, शास्त्रज्ञ अशा व्यक्तींचे आभार मानावेत तेवढे थोडे आहेत . . . डुलकी लागता लागता गाणं ऐकू आलं खास किशोर कुमार गात होता पल पल दिल के पास लग्नाआधी हिचं नि माझं लाडकं गाणं होतं मनामध्ये उलगडत गेलं आठवणीचं जणू पोतं किशोर रफी लता ऐकता मिटे मनी अंधार आभार आभार आभार तुमचे त्रिवार हो आभार
मार्च 20, 2015
'अन्नदाता सुखी भवं' असं सुभाषित आहे. मात्र आपल्या देशातील अन्नदात्या शेतकऱ्याच्या दुःखाची जाणीव आपल्या सारख्या अ-शेतकरी समाजाला खरंच आहे का? आपल्या बायका-मुलांना वाऱ्यावर सोडून आर्थिक कारणाकरता जेव्हा एखादी व्यक्ती आत्महत्या करण्यास प्रवृत्त होते, तेव्हा त्या दिवसापर्यंत त्या व्यक्तीने सहन केलेल्या दडपणाची आपण कल्पना करू शकतो. कृषीप्रधान देश अशी ओळख असलेल्या आपल्या देशात ह्या 'शेतकरी राजा'ची परिस्थिती कधी सुधारेल का? मोठे मोठे हुद्दे आणि मोठं मोठं वेतन जगण्यासाठी प्रत्येकाला लागे मात्र जेवण प्रत्येक जण म्हणतो आहे मोठं माझंच काम दिसत नाही कोणालाही शेतकऱ्याचा घाम जिंकत गेले सारे शेतकरी भोगतो सजा बाकी सारे तृप्त उपाशी शेतकरी राजा
मार्च 3, 2015
मार्च ८ - आंतरराष्ट्रीय महिलादिनाच्या सर्वांना शुभेच्छा. स्त्रीमुक्तीच्या बाबतीत आपल्या मध्यमवर्गीय पुरुषप्रधान समाजाने बरीच मजल मारली आहे. "मी माझ्या बायकोला मारत नाही" हे विधान "मला लिहिता वाचता येतं" ह्या विधानाइतकं कालबाह्य झालं आहे. मात्र ही केवळ सुरुवात आहे. अजून बराच पल्ला गाठायचा आहे. आंतरराष्ट्रीय महिलादिन पाळायची गरज वाटणार नाही तो खरा सुदिन . . . तिचं अमुक वागणं चालेल हे ठरवणारा मी कोण? तिचं तमुक वागणं चालणार नाही हे तरी ठरवणारा मी कोण? मला आहे निदान तेवढं तरी स्वातंत्र्य तिला आहे का? आपलं वागणं ठरवण्याचा अधिकार तिला आहे का? ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/QwU7MvEPfMA ह्या ठिकाणी ऐकता येईल.
फेब्रुवारी 20, 2015
नवरसांतील (खाजगीत) सर्वात जास्त आवडणारा रस म्हणजे शृंगार रस. आणि मराठी भाषेत शृंगार रस म्हटलं की लावणीला पर्याय नाही . . . तुम्हासाठी केला शिणगार वाट बघत झाला अंधार तुमच्या मनात तिचे विचार मन धावे तिकडं जाया तुम्हा ओळखलंय मी राया नाही सुटणार आता अबोला तुम्हा ओळखलंय मी राया जरी केलीत लाडीगोडी जरी पडलात माझ्या पाया
फेब्रुवारी 6, 2015
अनेकदा टॅक्सी, रिक्षा, गाड्यांच्या मागे 'देवाक् काळजी' असं लिहिलेलं असतं. देवावर एकदा सारा भार सोपवला की मनःशांतीची द्वारं खुली होत असतील. शंका, चिंता किंवा विघ्न अशा कोणत्याही प्रसंगात आपलं ओझं वाहणारी एक समर्थ शक्ती आपल्या पाठीशी उभी आहे हा दिलासा माणूस नेहमीच मनात जपत आलेला आहे . . . ठेवू नकोस किंतु मोही नकोस गुंतू वाहून सर्व तंतू हरीचरण शरण जावे दिवसाही आणि राती ऋतू सर्व येत जाती विसरून समयनाती हरीचरण शरण जावे
जानेवारी 16, 2015
भारत हा विरोधाभासांचा देश आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. आपली लोकसंख्याच एवढी आहे की विरोधी विचारसरणीच्या लोकांची टक्केवारी जरी कमी असली तरी त्यांचा आकडा मोठा असू शकतो. ह्या विरोधाभासांकडे कधी नाईलाजाने, कधी सोयीस्करपणे तर कधी निर्ढावल्याप्रमाणे दुर्लक्ष करायला आपण शिकलो आहोत . . . परदेशाची स्वच्छता डोळे दिपविते पाहता लाज नाही पण थुंकता हे दोन्ही देश माझे गातो एकतेचे गुण सारे पण धर्म जातही प्यारे भिंती बांधून अडवू वारे हे दोन्ही देश माझे ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/dvRP__5wF9U ह्या ठिकाणी ऐकता येईल.
जानेवारी 2, 2015
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आधीच वेळ कमी मिळतो, त्यात एकविसाव्या शतकातील आधुनिक उपकरणांनी आपल्या उरलेल्या वेळेचाही ताबा घेतलेला आहे. आपण बोलत असताना एखाद्याचं आपल्याकडे लक्ष नसणं किंवा एखादी गोष्ट तू मला सांगितलीच नाहीस असं एखाद्याने सांगणं हे प्रकार आता वारंवार घडू लागले आहेत. साध्या साध्या गोष्टीतही 'कहीं पे निगाहें कहीं पे निशाना' म्हणावं लागत आहे . . . आजकालचा माणूस हरपे मेंदूवरती चढती पुटे नजर कुठे अन् लक्ष कुठे शाळेमधली गंमत सांगत मुलगी थुईथुई नाचे महाशयांची नजर मात्र संदेश फोनवर वाचे हिरमुसलेल्या कन्येचे त्या काही क्षणांतच हृदय तुटे नजर कुठे अन् लक्ष कुठे
डिसेंबर 19, 2014
केस पिकण्यामागे जैवरासायनिक कारण काहीही असो, एक गोष्ट मात्र नक्की की त्या वयात मनुष्य आयुष्याचं सिंहावलोकन करायला शिकतो. आयुष्यात अनुभवलेले हेवे-दावे, भांडणं, सुख-दुःखाचे प्रसंग . . . एकूण आयुष्यापुढे कोते वाटू लागतात. तुम्हाला आलाय का असा अनुभव? आयुष्य असते फारच छोटे मजला कळून चुकले आता केस पिकले नकार मिळता तिच्या मुखातून पचला नव्हता धक्का भीष्मासम ब्रह्मचर्य पाळीन विचार केला पक्का गृहस्थ पुरता आता शंका नाही एकही टक्का प्यार मुहोब्बत असली गाणी ऐकून कान किटले आता केस पिकले