गुलज़ारजी, तुमचं कवितांचं पुस्तक वाचलं
त्रयस्थाने बघावं तसं दिसू लागलं … आयुष्य
काही खोलवर पुरलेल्या भावना … बोचू लागल्या
आरशांसारखी लख्ख झाली … काही नाती
काही निसर्गाची तर काही निसर्गाचंच अंग असलेल्या माणसांची
आसपासच्या रोजच्या वस्तूंचे बदलले संदर्भ
कैक वेळा पाहिलेल्या वास्तूंना प्राप्त झाला नवा अर्थ
त्याच जागा पण निराळ्याच भासू लागल्या
मनातला गुंता सुटत गेला
मनाला पडलेला पीळ उलगडत गेला
मन मोकळं झालं दावणीला बांधलेलं वासरू मोकळ्या माळरानावर