सप्टेंबर 20, 2013
लोकशाही म्हणजे बहुमताचा मान . . . पण मग बहुमताने अराजक माजलं तर त्याचाही मान ठेवायचा का? माझ्या सभोवती बहुतांश लोक जर मग्रुरी, लबाडी, अस्वच्छता, असहिष्णुता, भ्रष्टाचार ह्या गोष्टींचा पुरस्कार करत असतील तर मीसुद्धा त्यांच्यासारखं बनावं का? आणि नाही बनलो तर मी ह्या देशात राहायला नालायक ठरतो का?
रस्त्यांमध्ये मांडव
दिवसरात्रीचे तांडव
रांगा लावून दर्शन घेती पंचक्रोशीतील बांधव
माझा सोडून प्रत्येकाचा चेहरा आहे हसरा
माझ्या देशामध्ये कसा हा मीच जाहलो उपरा









