फेब्रुवारी 7, 2014
'गोळ्या घातल्या पाहिजेत एकेकाला' किंवा 'सरळ फासावर चढवा' असे शब्द आपल्या तोंडून किती सहजपणे निघून जातात. जगाच्या अति लोकसंख्येमुळे मृत्यूबद्दल आपल्या संवेदनाच बधीर झाल्या आहेत का? चर्चा करू या असं म्हणून आपला देश शत्रूपुढे वाकतो धडधड बॉम्ब टाकून शत्रूचा देश करा बेचिराख तो किती सहज निघतात आपल्या तोंडून असे विखारी बोल विसरून गेलो आहोत आपण माणसाच्या जीवाचं मोल









