कविता

काव्यकथा

लहानपणी चांदोबा, किशोरमध्ये वाचलेल्या छोट्या छोट्या गोष्टी, आई आणि आजीने सांगितलेल्या गोष्टी मनात अगदी घर करून राहतात. आणि आता मोठेपणी ह्या लहान गोष्टींची जागा घेतली आहे ईमेल आणि लघुसंदेशांनी. अशा ह्या मनाच्या कोपऱ्यात दडलेल्या गोष्टींनी काव्यकथा बनलेल्या आहेत. ह्या कथा माझ्या नाहीत पण कविता नक्कीच माझ्या आहेत.

ऑगस्ट 21, 2015

बायकोचा मित्र

'घर की मुर्गी दाल बराबर' ही उक्ती लग्न झालेल्या प्रत्येक पुरुषाला लागू पडत असावी असा समज WhatsAppवर येणाऱ्या 'बायको' ह्या विषयावरील संदेशांच्या वर्दळीमुळे होणं साहजिक आहे. त्यामुळे 'बाहर की दाल मुर्गी बराबर' वाटणंही ओघानेच आलं. मात्र मध्यमवयीन पुरुषांच्या आयुष्यात येणारी बाहरवाली कुणाचीतरी बायको असते हे सोयीस्कररीत्या विसरलं जातं.

दुपारनंतर कुणास ठाऊक किती झाले चहा
आणि कूर्मगतीने वेळ सरकत वाजले एकदाचे सहा

थोडा वेळ चोळले कपाळावरचे आणि मानेचे स्नायू
मग हळूच लिहिलं लॅपटॉपवरील चॅटवर 'हॅलो, हाऊ आर यू'

'गिव मी टू मिनिट्स' असा मेसेज माझ्या स्क्रीनवर चढला
वाट पाहणारा माझा जीव भांड्यात पडला

रोज संध्याकाळचा हा सर्वात महत्त्वाचा टप्पा
आता रंगतील चांगल्या तास दीड तास गप्पा
जुलै 3, 2015

दरवडेखोर

खरं बोलणं कधीही चांगलं, पण एखाद्या निरुपद्रवी असत्याने जर कुणाच्या मनाला बरं वाटत असेल तर अशा खोटं बोलण्याला कुणाची हरकत नसावी. स्वामीजींनीही आश्रमात शिरलेल्या दरवडेखोराच्या बाबतीत असाच काहीसा विचार केला ... 

ग्रीष्मातील मध्यान्ह असो वा असो दिवाळी दसरा
     नाही बदलला स्वामीजींचा चेहरा प्रसन्न हसरा

ऐकून टापा घोड्यांच्या घाबरले लहान थोर
     आश्रमात शिरला जेव्हा तो एक दरवडेखोर
बंदूक त्याच्या पाठीवरती कमरेला अन् सुरा 
     कुणी धावला आडोशाला कुणी लपविते पोर

स्वामींपाशी एक जातसे मागून दुसरा तिसरा
     नाही बदलला स्वामीजींचा चेहरा प्रसन्न हसरा
मे 6, 2015

एक तास

दोन दिवसांपूर्वी अमेरिकेतील एका बावीस वर्षीय भारतीय तरुणाला कामाच्या अतिरेकी ताणामुळे आपले प्राण गमवावे लागले. भविष्यात सुखाचा उपभोग घेता यावा म्हणून दिवसरात्र एक करून काम करायचं आणि ते करताना आसपासच्या लहान लहान आनंददायी सुखांकडे दुर्लक्ष करायचं ही पद्धत आपल्याकडेही सर्वमान्य झाली आहे. पण एखाद दिवशी अशी घटना घडते की कामाच्या धुंदीत असलेल्या आपले डोळे खाडकन उघडतात ...

नवरा तिचा महत्वाकांक्षी तिच्याच इतका भारी
     एका म्यानामध्ये कशा मग राहतील दो तलवारी

प्रेमविवाहच असे परंतु नावापुरता फक्त
     तीन वर्षं झाली असतील अन् झाले ते विभक्त

तेव्हापासून चिंटूला मग फक्त तिचा आधार
     चिंटूही पण फारच होता मुलगा समजूतदार
नोव्हेंबर 21, 2014

बहिरा

दुसऱ्याकडे बोट दाखवताना (निदान) तीन बोटं आपल्याकडे वळलेली असतात हे आपण सोयीस्करपणे विसरतो. त्यामुळे कधी कधी आपलेच शब्द आपल्याच घशात जायची वेळ येते. अशाच कुठेतरी वाचलेल्या एका विनोदावर आधारित ही कविता . . . 

बरेच दिवस घोळत होता संशय माझ्या मनात
     गडबड आहे नक्की माझ्या बायकोच्या कानात
ह्या बाबतीत समजत नव्हतं करू तरी काय मी
     माझ्या बायकोला ऐकू येतंय का हो कमी?

नाक कान घसा तज्ज्ञ होता माझा मित्र
     भेटून त्याला मनचं माझ्या स्पष्ट केलं चित्र
मित्राने सांगितली मला शक्कल एक नामी
     माझ्या बायकोला ऐकू येतंय का हो कमी?
नोव्हेंबर 7, 2014

वीज

भारतातील ज्या असंख्य खेड्यांमध्ये अजूनही वीज पोहोचलेली नाही त्यांनी वीज ही फक्त तालुक्याच्या ठिकाणी पाहिलेली असते. ज्या अनेक गावांत वीज काही तासांकरताच मिळते त्यांना विजेचं महत्व कळतं. शहरांची गोष्ट मात्र वेगळी आहे. इथे वीज जाणार ह्या विचारानेच आपल्याला घाम फुटतो. गंमत म्हणजे पूर्णपणे विजेचे गुलाम बनलेले आपण ह्या दास्यातून मुक्ती मिळाली तर पार सैरभैर होऊन जाऊ . . . 

शांत होते रस्ते झाली होती निजानीज
     आमच्या शहरामधून एकदम गायब झाली वीज।।

घामाघूम झालो आम्ही सारे बसलो उठून
     एसीकरता बंद घर वारा येईल कुठून
थोड्याच वेळात येईल आमचा विचार होता पक्का
     प्रातःकाळी पेपर वाचून बसला मोठा धक्का

सात दिवस बंद राहील करा तुम्ही तजवीज
     आमच्या शहरामधून एकदम गायब झाली वीज।।
जुलै 4, 2014

पाप

पाप-पुण्याची अध्यात्मिक चर्चा ऐकायची असेल तर स्मशानासारखी जागा नाही. मरणाची अपरिहार्यता नजरेसमोर उभी ठाकली की राग, लोभ, द्वेष, मत्सर ह्या भावनांचा फोलपणा जाणवू लागतो. मात्र स्मशानभूमीच्या बाहेर हे विचार जिवंत ठेवू शकणारा खरा योगी असतो!

निरखून बघती स्वामी चिंता चेहऱ्यावरती आली
     माझे सोड अभाग्या लिहिले काय तुझिया कपाळी
तुझ्या जीवनी आता केवळ दिवस राहिले सात
     स्पष्ट दिसतसे मजला ती मृत्यूची सावली काळी

भाविक तो दचकुनिया उठला जसा दिसावा साप
     विसरुनी गेला प्रश्न स्वतःचा काय पुण्य अन् पाप