जानेवारी 16, 2015
भारत हा विरोधाभासांचा देश आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. आपली लोकसंख्याच एवढी आहे की विरोधी विचारसरणीच्या लोकांची टक्केवारी जरी कमी असली तरी त्यांचा आकडा मोठा असू शकतो. ह्या विरोधाभासांकडे कधी नाईलाजाने, कधी सोयीस्करपणे तर कधी निर्ढावल्याप्रमाणे दुर्लक्ष करायला आपण शिकलो आहोत . . .
परदेशाची स्वच्छता
डोळे दिपविते पाहता
लाज नाही पण थुंकता
हे दोन्ही देश माझे
गातो एकतेचे गुण सारे
पण धर्म जातही प्यारे
भिंती बांधून अडवू वारे
हे दोन्ही देश माझे
ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/dvRP__5wF9U ह्या ठिकाणी ऐकता येईल.









