नोव्हेंबर 7, 2014
भारतातील ज्या असंख्य खेड्यांमध्ये अजूनही वीज पोहोचलेली नाही त्यांनी वीज ही फक्त तालुक्याच्या ठिकाणी पाहिलेली असते. ज्या अनेक गावांत वीज काही तासांकरताच मिळते त्यांना विजेचं महत्व कळतं. शहरांची गोष्ट मात्र वेगळी आहे. इथे वीज जाणार ह्या विचारानेच आपल्याला घाम फुटतो. गंमत म्हणजे पूर्णपणे विजेचे गुलाम बनलेले आपण ह्या दास्यातून मुक्ती मिळाली तर पार सैरभैर होऊन जाऊ . . .
शांत होते रस्ते झाली होती निजानीज
आमच्या शहरामधून एकदम गायब झाली वीज।।
घामाघूम झालो आम्ही सारे बसलो उठून
एसीकरता बंद घर वारा येईल कुठून
थोड्याच वेळात येईल आमचा विचार होता पक्का
प्रातःकाळी पेपर वाचून बसला मोठा धक्का
सात दिवस बंद राहील करा तुम्ही तजवीज
आमच्या शहरामधून एकदम गायब झाली वीज।।









