फेब्रुवारी 4, 2011
मानवाच्या वैज्ञानिक प्रगतीमध्ये भारताचं योगदान 'शून्य' आहे! कारण मानवी इतिहासातील सर्वात जास्त क्रांतिकारी मानल्या जाणाऱ्या शोधांपैकी एक अशा शून्याचा शोध भारतात लावला गेला. संपूर्ण विज्ञान ह्या एका शून्यावर आधारित आहे. आणि क्लिष्ट होत जाणारं विज्ञान जसजसं तत्वज्ञानाच्या जवळ जात आहे तसतसं तत्वज्ञानातीलही शून्याचं महत्व अधिकाधिक जाणवू लागलं आहे.
आपल्याला एखादी भौतिक वस्तू जेव्हा दिसते
संदर्भाला आजुबाजूस दुसरे काही असते
परमेश्वर जर ब्रह्मांडाच्या चराचरातून वसतो
दिसेल कसा तो कोणालाही संदर्भच जर नसतो
शून्यत्वाचं रूप र्इश्वरी झालं म्हणूनच मान्य
अनंत मोठ्या ब्रह्मांडाचं उत्तर आहे शून्य
ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/mC5SjpZlGq0 ह्या ठिकाणी ऐकता येईल.








