सप्टेंबर 16, 2016
अज्ञानी समाजात एखाद्या व्यक्तीला ज्ञानप्राप्ती होते आणि मग ही व्यक्ती अज्ञानाचा अंधःकार दूर कसा करता येईल त्या दृष्टीने प्रयत्न करू लागते. अशा व्यक्तीबाबत सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया दोन टोकांच्या असतात. एक तर समाज त्या व्यक्तीला वेडं ठरवतो किंवा देवत्व देतो. दोन्ही बाबतीत त्या व्यक्तीचे विचार समजून घेण्याची जबाबदारी मग समाजाची राहत नाही. मग हा समाज माणसांचा असो नाहीतर मुंग्यांचा ... ओसाड होती जागा तेथे होते एक वारूळ शिरले होते त्या मुंग्यांच्या डोक्यात एक खूळ वारुळाच्या बाहेर नजरेस लाल गोळा पडे हलत होता परत परत उजवी डावीकडे एकाच रेषेत दिसू शकायची त्यांना सारी सृष्टी मुंग्यांच्या त्या समुहा होती एकमितीय दृष्टी
सप्टेंबर 2, 2016
खुल्या अर्थव्यवस्थेमुळे नव्या पिढीकरता कारकिर्दीची अनेक दालनं उघडत आहेत. शिक्षण आणि नोकऱ्यांचे सरधोपट मार्ग बदलत चालले आहेत. हे नवीन मार्ग निवडण्याकरता घरापासून दूर जाणं हे आता अपवादात्मक राहिलेलं नाही. एक किंवा दोनच मुलं आणि तीही परगावी / परदेशी स्थायिक होणं हे अनेक मध्यमवर्गीय घरांचं आजचं वास्तव आहे. अशा घरांनी बनलेली ही अशीच एक इमारत ... नवीन पिढीच्या पंखांत आता उसळत होती वीज खुणवत होतं त्यांना रोज एक नवं क्षितिज किती दिवस त्या इमारतीच्या भिंती त्यांना ठेवणार होत्या धरून एक एक करत सारी पिल्लं घरट्यांतून गेली उडून उभी होती त्यांच्या बालपणीच्या स्मृती गोंजारत अशीच एक इमारत ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/0zKQHfoncWs ह्या ठिकाणी ऐकता येईल.
ऑगस्ट 19, 2016
काल गुलज़ारजींचा वाढदिवस होता. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. काही दिवसांपूर्वी त्यांचा कवितासंग्रह वाचायचा योग आला. त्यांच्या कविता वाचून माझ्या मनात आलेले हे काही विचार ... गुलज़ारजी, तुमचं कवितांचं पुस्तक वाचलं कडक उन्हाचे चटके अवचित आलेल्या सरी ... जणू श्रावण आला ओठांच्या कडांना हसू डोळ्यांच्या कडांना पाणी ... एकाच वेळी अतिभव्य ब्रह्माण्डाएवढं सामावणारं एका सूक्ष्म कणात शब्दांना एवढं वजन असतं ... ठाऊक नव्हतं शब्दांना रंग आकार स्पर्श असतो ... ठाऊक नव्हतं शब्दांत भावना व्यक्त करता येतात, ठीक आहे शब्द श्वास घेतात ... ठाऊक नव्हतं
जुलै 22, 2016
वाढती वयोमर्यादा आणि आण्विक कुटुंबसंस्था ह्यामुळे वार्धक्याचा सामना कसा करायचा हा प्रश्न भेडसावू लागला आहे. जात्यातल्यांना भरडताना पाहून आता सुपातलेही चिंतातुर होऊ लागले आहेत. स्वाभिमानाने आयुष्य जगल्यामुळे म्हातारपणी आपण कोणावर ओझं तर बनणार नाही ना हा विचार चाळिशीतच त्रास देऊ लागला आहे. मात्र काही बाबतीत अति स्वाभिमान दाखवणंही चुकीचं ठरू शकतं... झाले पाऊणशे वयमान नेहेमी ताठ ठेविली मान केला नाही सहन कोणता आयुष्यात कधी अपमान माझा मित्र मला भेटला तो वृद्धाश्रम संस्थेतला जाऊन राहीन त्या संस्थेत माझा निर्णय मी घेतला मनात दाटे औदासिन्य मन तरी वागते अहंमन्य इकडे आड विहीर अन् तिकडे नव्हता विकल्प कुठला अन्य
जून 17, 2016
माकडापासून मानव उत्क्रांत होताना शेपटी हा शरीराचा एक अवयव गेला पण व्यसन हा मनाचा एक अवयव मात्र चिकटला. बढाईखोरांचं "मला सुपारीच्या खांडाचंही व्यसन नाही." इथपासून "मी WhatsApp दिवसातून फक्त तीनदाच check करतो." इथपर्यंत स्थित्यंतर आपण बघितलं आहे. सर्व व्यसनांपासून मुक्ती ही एक अद्भुतरम्य कल्पना आहे. व्यसनामुळे आपल्याला आनंद मिळत असताना दुसऱ्यांना त्रास होऊ नये एवढी काळजी मात्र नक्कीच घेता येईल... व्यसन नावाच्या सापळ्याचे असतात खूप प्रकार बाहेरख्यालीपणापासून सिगरेट दारू जुगार व्यसन कॉम्प्युटरचं असलं तहान नाही भूक माणसं झाली बेटं कारण नाती झाली मूक
जून 3, 2016
सध्या प्रसारमाध्यमांचं युग सुरु आहे. टीवी, व्हॉट्सॲप, फेसबुक वगैरे माध्यमांवर अनेक प्रश्नांबाबत तावातावाने चर्चा चाललेली असते. प्रत्येकाकडे प्रत्येक प्रश्नाचं काही ना काही उत्तर असतं. आणि तरीही काही प्रश्न सोपी उत्तरं न दिल्याने कठीण होऊन बसलेले आहेत. मला पडलेले असेच काही 'कठीण' प्रश्न... माझ्या मनात काही प्रश्न आहेत मोठे रास्त उत्तर ज्यांचं मिळणं मोठं झालंय दुरापास्त विडी सिगारेट आरोग्याला अपायकारक फार कानीकपाळी ओरडून सांगे आपल्याला सरकार तंबाखूचा उद्यम कैसा चाले मग निर्धास्त उत्तर ज्यांचं मिळणं मोठं झालंय दुरापास्त
एप्रिल 4, 2016
माणूस समूहात राहणारा प्राणी असल्यामुळे बरेचदा त्याच्याकरता मुंग्या, पक्षी, मासे अशा समूहात राहणाऱ्या प्राण्यांची उपमा वापरली जाते. मात्र माणूस हा ह्या इतर प्राण्यांपेक्षा सर्वस्वी भिन्न प्राणी आहे. प्रत्येक माणसाला स्वतःच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाची जाणीव असते. त्यामुळे माणसाकरता आपल्या समूहाच्या संरक्षणाएवढंच स्वतःचं वैयक्तिक संरक्षणही महत्वाचं असतं... तुझ्यात विचार करण्याची क्षमता आहे तुझ्यात निर्णय घेण्याची क्षमता आहे पृथ्वीवरील जीवसृष्टी पुढे नेणं हे तुझं लक्ष्य नव्हे तुझं जगणं केवळ भक्षक किंवा केवळ भक्ष्य नव्हे तू आहेस तोवर ब्रह्मांड आहे तुझं एकच आयुष्य आहे काळजी घे
मार्च 18, 2016
तीन खोल्यांच्या घरात राहणाऱ्या बऱ्याच जणांना चार खोल्यांच्या घराची आस असते. त्याच वेळी काही जण दोन खोल्यांच्या घरातही सुखाने नांदतात. असण्या / नसण्याच्या प्रत्येक पायरीवर आपल्याला हा विसंवाद दिसून येतो. ह्याला कारण म्हणजे आपण बहुतेक सगळेच 'नव्याण्णववासी' आहोत . . . राजा होता एक स्वामींपाशी आला होता मोठा नेक पण दुःखी होता झाला माझ्यापाशी छान सुखसंपत्ती सारी तरीही समाधान नाही मनाच्या दारी स्वामी थोडे हसले हळूच आपुल्या गाली राजासमोर बसले नजर तयाच्या भाळी चिंता तुझ्या मनाशी आहे त्याच्या मागे तू नव्याण्णववासी कारण आहे साधे
मार्च 4, 2016
आपल्या देशभक्तीच्या संकल्पना अगदी ठसठशीत आहेत. देशदर्शक कोणत्याही प्रतीकाला जराही धक्का लागला तर आपण ते खपवून घेत नाही. मात्र देशप्रेमाची भावना कायदे आणि नियम पाळण्याच्या लहान लहान कृतीमधून जास्त दृगोच्चर होऊ शकते हे आपण 'सोयीस्कर'पणे विसरत तर नाही ना? त्या देशद्रोह्यांविरुद्ध सात्त्विक संताप अनावर झाला व्यक्त करण्याकरता जो तो सामाजिक माध्यमांवर आला प्रत्येकाची देशप्रेमाची व्याख्या होती सुस्पष्ट आणि नीट देशप्रेम म्हणजे झेंडा देशप्रेम म्हणजे राष्ट्रगीत देशभक्तीची परिमाणे बदलून कशी चालतील उगीच सर्वांना कायदे आणि नियम पाळावे लागतील
फेब्रुवारी 5, 2016
सुख आणि दुःख ह्या दोन्ही सापेक्ष गोष्टी आहेत. इतरांच्या दृष्टीने दारिद्र्यात पिचलेला, संकटांनी घेरला गेलेला मनुष्यही सुखी असू शकतो आणि लौकिकार्थाने सर्व सुखांनी ज्याच्या पायाशी लोळण घेतली आहे असा मनुष्यही अत्यंत दुःखी असू शकतो. आपल्या प्राक्तनात लिहिलेल्या आयुष्याला स्वर्ग म्हणायचं की नरक हे ज्याच्या त्याच्या वृत्तीवर अवलंबून असतं... देवदुताने आश्चर्याने चित्रगुप्तास पुसले शेठ किरोडीवरी येथले भाग्य असे का हसले दीनदुःखीतांना लुटले हा मनुष्य ऐसा पापी पैशांकरता केले ह्याने धंदे कसले कसले पाप्यांना जर सुख मिळाले बसेल कैसा वचक हा तर आहे नरक
जानेवारी 15, 2016
घरचे आणि ऑफिसचे ताण-तणाव, गरिबी, महागाई, देशातील सद्यस्थिती, मुलभूत सुविधांसाठी करावी लागणारी धडपड, स्पर्धा अशा अनेक समस्यांना तोंड देणारे आपण वेडे होऊन आत्महत्या करत नाही ह्याला एक कारण आहे. आपल्या प्रत्येकाकडे एक तरी अफूची गोळी असते. कठीण प्रसंगी नशा करावी असते समजूत भोळी प्रत्येकाची अशा प्रसंगी असे अफूची गोळी नवे वर्ष हे आपुल्याकरता आहे फार कठीण येतील आव्हाने तुमच्या सामोरी नवीन नवीन कर्मचारी आपुले पण साऱ्या देशी सर्वोत्तम सांगावे किती काम तयांना येतच नाही शीण हरेक मॅनेजर सांगे दर वर्षी अशाच ओळी काम कर्मचाऱ्यांकरता ती असे अफूची गोळी
जानेवारी 1, 2016
खऱ्या सामर्थ्याची ओळख पटण्याकरता पुरावे द्यावे लागत नाहीत आणि जाहिरातही करावी लागत नाही. दोन व्यक्ती भांडत असताना कोणती व्यक्ती सामर्थ्यवान आहे आणि कोणती केवळ आव आणत आहे ते लगेच कळतं. इंद्रदेव आणि शनिदेव एकदा भांडले. त्या भांडणाचा निकालही असाच काहीसा लागला ... प्रलय जाहला तिन्ही लोकी लोक भ्यायले मनी स्वर्गामध्ये भांडत होते इंद्रदेव अन् शनी चूक कुणाची होती प्रश्न हा झाला कधीच बाद तू मोठा का मी मोठा हा खरा शेवटी वाद अंती वदला शनी ठेविला नाहीस माझा मान शूर स्वतःला समजतोस तर हे माझे आव्हान