शाळेतील वर्गात, बाकावर बसणारे मित्र काही बरे काही चांगले
शाळा संपल्यावर सगळेच आपापल्या विश्वांत पांगले ॥
काळाबरोबर घरंगळत जाऊन मीही रमलो आपल्या विश्वात
आधी शिक्षण मग नोकरी आणि मग लग्नाच्या बंधनात ॥
ज्या सुमारास कौटुंबिक आणि आर्थिक आघाड्यांवर स्थैर्य आलं
त्याच सुमारास सोशल मिडियाच्या वादळाचं जगात आगमन झालं ॥
अचानक पांगलेले सारे मित्र ह्या सोशल मिडियावर लागले भेटू
वर्तमानाला भूतकाळाशी जोडणारा तो होता जणू एक सेतू ॥
दशकं लोटली होती त्यांच्याबरोबर गप्पा मारून, खेळून
नुसती नावं ऐकूनच मन आलं उचंबळून ॥
फोटो पहिले त्यांचे किती मोठे किती वेगळे दिसत होते ते आज
आपल्याबद्दल त्यांनाही असंच वाटत असेल, मनात वाटली थोडी लाज ॥
कुणी अधिकारी कुणी उद्योगपती कुणी बसवलं होतं परदेशी बस्तान
त्यांची प्रगती वाचून वाटला जेवढा हेवा तेवढाच अभिमान ॥