अश्विन मास संपता रघुवर वनवासाहून आले
अभूतपूर्व स्वागत मग त्यांचे अयोध्येमध्ये झाले
दीप प्रज्वलन करूनी सारे नगरच उजळूनी गेले
पाच दिवस अन् दिवाळीचा सण मग होई साजरा ॥
असे सुट्टी शाळेस आणखी गोड थंडीचा काळ
चकली चिवडा लाडू आणिक करंजीचा फराळ
कंदील पणत्या रांगोळी अन् फटाक्यांचा उजाळ
पाच दिवस मग दिवाळीचा सण असा होई साजरा ॥
अश्विन शुद्ध त्रयोदशीला धनलक्ष्मी ये दारी
उत्साहाने दिवे लावूनी पूजा करी व्यापारी
धन्वंतरीची पूजा आरोग्य मागती नर-नारी
पहिल्या दिवशी दिवाळीचा सण असा होई साजरा ॥
अभ्यंगस्नान करण्यास नरक चतुर्दशीला उठणे
राजेशाही स्नान कराया तेल सुगंधी उटणे
नरकसुराच्या नि:पाताला चिरटफळाचे फुटणे
दुसऱ्या दिवशी दिवाळीचा सण असा होई साजरा ॥