येता महिन्याचा पुन्हा तो एक विशिष्ट वार
शेतकर्याने नेहेमीसारखा गाठला मग बाजार
महिनाभर केली जी ती मेहेनत फळण्याकरता
केवळ आजच्या दिवसाचा असे त्यास आधार
आला कच्च्या रस्त्याची खात सगळी धूळ
कमार्इचं होतं त्याच्या केवळ एकच मूळ
बनवत असे महिनाभर सतत करून कष्ट
ताजा शुद्ध सोनेरी साखरेसारखा गूळ
जायचं होतं परत लांब होती त्याला घार्इ
महिनाभर चालवायची होती आजची कमार्इ
धान्य भाज्या भांडी कपडे मुलांसाठी खेळ
घरी वाट पाहती मुलं आणि त्यांची आर्इ
गूळ दुकानात विकायला त्याने गाठली पेठ
त्याला बघून बाहेर आला दुकानातला शेठ
चेहेर्यावर संताप त्याच्या मावता मावत नव्हता
येऊन शेतकर्याची त्याने मानगूट धरली थेट
2 Comments
सगळ्या कविता खूप खूप सुंदर अर्थपूर्ण
मनःपूर्वक धन्यवाद, मनीषा…